राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना लाभ देण्यात येणार आहे.
ज्येष्ठांना अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्र व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येईल.
आरोग्य विभाग मार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना ३००० रुपये एक रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येणार असून या योजनेसाठी ४८० कोटी रुपयांचा खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा फायदा प्राप्त करण्याच्या विषयी अधिक माहितीसाठी आपण स्थानिक तालुका कार्यालय किंवा नजीकच्या ग्रामपंचायतीला संपर्क साधावा व कार्यालयीन कर्मचाऱ्यांशी संपर्क करावा.